शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चारा, पाणी मिळत नसल्याची तक्रार नको; एकनाथ शिंदेंच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 23:12 IST

सातारा : ‘जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती भयंकर आहे. त्यामुळे जनावरांना चारा आणि माणसांना पाणी देण्यासाठी ...

सातारा : ‘जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती भयंकर आहे. त्यामुळे जनावरांना चारा आणि माणसांना पाणी देण्यासाठी प्रशासनाने तयार राहावे. चारा, पाणी मिळत नाही, अशी एकही तक्रार येता कामा नये,’ अशी सक्त सूचना बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली. तसेच यावेळी त्यांनी खटाव तालुका दुष्काळात कसा येईल, हे अधिकाºयांनी पाहावे, असेही स्पष्टपणे सांगितले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत मंत्री शिंदे बोलत होते. माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी केल्यानंतर ही बैठक झाली. यावेळी आमदार शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, नरेंद्र पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, उपशहरप्रमुख शिवाजीराव इंगवले तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.मंत्री शिंदे म्हणाले, ‘जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्याचा दुष्काळी दौरा केला. या तालुक्यांत जनावरांसाठी चारा आणि पाण्याचा प्रश्न मोठा आहे. खटावमध्ये तर ठराविक काही गावे सोडली तर सर्वत्र पिके करपून गेल्याचे दिसून आले. दुष्काळी भागातील काही गावांत तर आठ-दहा दिवसांत जनावरांसाठी चारा द्यावा लागेल, अशी स्थिती आहे. अशा स्थितीत सर्व गोष्टी तुमच्या हातात नाहीत; पण लोकांच्या मागणीची नोंद घेणे हे तुमच्याकडे आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी सतर्क राहून दुष्काळग्रस्तांना दिलासा द्यावा.’दरम्यान, या आढावा बैठकीत प्रामुख्याने कृषी, पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. जिल्ह्यातील विविध पाणी योजनांचीही माहिती मंत्री शिंदे यांनी घेतली. तसेच शेतकºयांच्या फळबागा जळू लागल्या आहेत. त्यासाठी काही करता येईल का, याविषयीही चर्चा झाली.टँकर वाढवावे लागतील...जिल्ह्णात चारा, पाणी आणि लोकांच्या हाताला काम हे महत्त्वाचे आहे. येत्या काही दिवसांत माण आणि खटाव तालुक्यात पाण्यासाठी टँकर वाढवावे लागतील, त्यासाठी प्रशासनाने आतापासून तयारी करावी. लोकांना दिलासा देण्यासाठी काम करावे, अशी सूचनाही मंत्री शिंदे यांनी केली.खटावचे पाचवेळा नाव...मंत्री शिंदे हे सायंकाळी पावणेसातच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आले. यावेळी त्यांनी प्रथम जिल्हाधिकाºयांच्या केबिनमध्ये अधिकाºयांकडून माहिती घेतली. त्यावेळी मंत्री शिंदे यांनी खटाव तालुका प्रथम दुष्काळात कसा बसेल हे पाहा, असे सांगितले. त्यानंतर दुसºया हॉलमध्ये अधिकाºयांबरोबर बैठक झाली. त्यावेळी प्रशासनाने काय काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती घेतली. त्यावेळीही तीन ते चार वेळा खटाव तालुका दुष्काळात कसा बसेल ते पाहा, असे शिंदे यांनी सांगितले. तसेच याबाबत मी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललो आहे. मुख्यामंत्र्यांशीही बोलणार आहे, असे सांगून दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी अधिकाºयांना राहण्याचे सूचित केले.जिल्ह्णात आठ महिन्यांचा चारा उपलब्ध...आढाव्यादरम्यान, अधिकाºयांनी जिल्ह्णात सुमारे आठ लाख पशुधन असल्याचे सांगितले. त्यांच्यासाठी आठ महिने पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. तसेच कालवे असणाºया परिसरात चारा लागवड करण्यात येत आहे. त्यामुळे दुष्काळी जनावरांसाठी चारा कमी पडणार नसल्याने अधिकाºयांनी सांगितले. तसेच यावेळी शिंगणापूर पाणी योजना आणि जिहे कटापूर, उरमोडी पाणी योजनेविषयीही माहिती देण्यात आली.